Posts

Showing posts from 2020

वरंधा घाटचा रक्षक अपरिचित कावळ्या किल्ला

Image
                     सह्याद्रीत  खूप  प्रमाणात दुर्लक्षित किल्ले आहेत... नेहमीच्या किल्ल्याच्या भटकंती टाळून अश्या अडवाटेवरच्या किल्ल्यांची भेट घेत दुर्गजागर राबता ठेवायला हवा... असाच एक किल्ला आहे कावळ्या किल्ला जो ब्रिटिशांनी विभाजुन कोकणात उतरण्या करता (भोर-महाड)वरंधा घाट तयार केला आहे...हा  किल्ला करायचा असेल तर अर्धा दिवस सुद्धा पुरतो.. घाटा मुळे किल्ल्याचे विभाजन उत्तर व दक्षिण बाजू अशी झाली आहे.        वरंधाच्या पवार हॉटेल पासून ५ मिनिटे डाम्बरी रस्त्याने चालल्यावर  एक वाट डावी कडे वळते आणि झाडीत शिरते... पुढे चालून गेलं की सपाटी मैदानावर ८ खांब  टाक्याचा समूह आहे. जनावरांना पिण्याकरता चर खोदला आहे.पुढे चालत गेल की गडाची वाघजाई  देवी मंदिर व दगडात कोरलेलं पाण्याचं भांड लागते.मंदिराची डाग डुजी करून tiles बसवले आहेत.अजून थोडं पुढं गेलं की दक्षिण बाजूचे शेवटचे टोक लागते,उत्तर बाजूचे किल्ल्याचे व वरंधा घाट चे सुंदर दृश्य इथून दिसते,इथून खाली उतरण्या करता दक्षिण बाजूला पाहिऱ्...

सालोटा दुर्ग सफर... (उत्तरार्ध)

Image
                                            साल्हेरचे दहा दरवाजे अजून ही शाबूत आहेत,शिलालेख युक्त दरवाजे असलेला पूर्ण सह्याद्रीमध्ये तरी साल्हेर सारख अलौकिक दुर्ग नाही... डोलबारी रांगेत साल्हेर दुर्गाचा भाऊ आहे सालोटा किल्ला ,सालोटा केल्या शिवाय ह्या परिसराची भटकंती पूर्ण होत नाही... उंचीला साल्हेर पेक्षा थोडा कमी जरी असला तरी सालोटा भटकंती साठी चांगलंच दमवतो..पूर्व पश्चिम पसरलेल्या ह्या किल्ल्याला प्रवेश मात्र दक्षिण बाजूने आहे.. साल्हेरच्या वाघांमबे खिंड जवळील दरवाज्या पासून दिसणारा सालोटा आणि त्याच्या खांद्या वर असलेली मुंगी समान दिसणारे माणस               साल्हेर पाहून वाघांमबे खिंडीत पोहचलो होतो,सूर्य डोक्यावर नाचु लागला होता,एक वाजले होते,साल्हेर वर सात तासाची रपेटी मुळे पायाला गोळे आले होते,पण पुढचा किल्ला नाक वर करून आमच्या कडे बघत होता  जसा कुणी पैलवान हातावर हात ठेवून जवळ बोलावतोय ,डॉक्टर व भावदास किमान 10...

कावळ्या घाटाचा रक्षक कोकणदिवा किल्ला

Image
                           असे काही गडकोट असतात जे जवळ असून सुद्धा आपली भटकंती त्या जागे ला लाभलेली नसते.. असाच एक किल्ला बऱ्याच वर्षा पासून हुलकावणी देत होता.. तो म्हणजे रायगडचा पहारेकरी कोकणदिवा... रायगड ला गेलो किंवा लिंगाणामाची, तेथून हा किल्ला हमखास दिसणारा....               देशा वरून रायगड च्या घाट वाटांवर लक्ष देण्याकरता जसे लिंगाणा-कावळ्या किल्ला आहेत तसेच कोकणदिवा देखील आहे.. कावळ्या घाट सुद्धा किल्ल्याचा पोटातून जातो.. त्या मुळे हा किल्ला स्वराज्य च्या दृष्टीने खूप महत्व पूर्ण आहे..                 मी, डॉ संग्राम इंदोरे व भूषण शिंदे दादा असे आम्ही तिघे वर्षाच्या शेवटच्या रविवार किल्ल्या कडे निघालो,पहाटेच एकत्र निघालो...आमची गाडी खडकवासला ला मागे टाकत  पानशेत धरणाच्या फुगवट्या पासून उजव्या बाजूने जाऊ लागली...  खडकवासला पासून किल्ला 70किमी आहे.. वळणा वळणा च्या वाटेवर हळू हळू काळोख नाहीसा होत होता आणि सह्याद्र...