Posts

सालोटा दुर्ग सफर... (उत्तरार्ध)

Image
                                            साल्हेरचे दहा दरवाजे अजून ही शाबूत आहेत,शिलालेख युक्त दरवाजे असलेला पूर्ण सह्याद्रीमध्ये तरी साल्हेर सारख अलौकिक दुर्ग नाही... डोलबारी रांगेत साल्हेर दुर्गाचा भाऊ आहे सालोटा किल्ला ,सालोटा केल्या शिवाय ह्या परिसराची भटकंती पूर्ण होत नाही... उंचीला साल्हेर पेक्षा थोडा कमी जरी असला तरी सालोटा भटकंती साठी चांगलंच दमवतो..पूर्व पश्चिम पसरलेल्या ह्या किल्ल्याला प्रवेश मात्र दक्षिण बाजूने आहे.. साल्हेरच्या वाघांमबे खिंड जवळील दरवाज्या पासून दिसणारा सालोटा आणि त्याच्या खांद्या वर असलेली मुंगी समान दिसणारे माणस               साल्हेर पाहून वाघांमबे खिंडीत पोहचलो होतो,सूर्य डोक्यावर नाचु लागला होता,एक वाजले होते,साल्हेर वर सात तासाची रपेटी मुळे पायाला गोळे आले होते,पण पुढचा किल्ला नाक वर करून आमच्या कडे बघत होता  जसा कुणी पैलवान हातावर हात ठेवून जवळ बोलावतोय ,डॉक्टर व भावदास किमान 10...

कावळ्या घाटाचा रक्षक कोकणदिवा किल्ला

Image
                           असे काही गडकोट असतात जे जवळ असून सुद्धा आपली भटकंती त्या जागे ला लाभलेली नसते.. असाच एक किल्ला बऱ्याच वर्षा पासून हुलकावणी देत होता.. तो म्हणजे रायगडचा पहारेकरी कोकणदिवा... रायगड ला गेलो किंवा लिंगाणामाची, तेथून हा किल्ला हमखास दिसणारा....               देशा वरून रायगड च्या घाट वाटांवर लक्ष देण्याकरता जसे लिंगाणा-कावळ्या किल्ला आहेत तसेच कोकणदिवा देखील आहे.. कावळ्या घाट सुद्धा किल्ल्याचा पोटातून जातो.. त्या मुळे हा किल्ला स्वराज्य च्या दृष्टीने खूप महत्व पूर्ण आहे..                 मी, डॉ संग्राम इंदोरे व भूषण शिंदे दादा असे आम्ही तिघे वर्षाच्या शेवटच्या रविवार किल्ल्या कडे निघालो,पहाटेच एकत्र निघालो...आमची गाडी खडकवासला ला मागे टाकत  पानशेत धरणाच्या फुगवट्या पासून उजव्या बाजूने जाऊ लागली...  खडकवासला पासून किल्ला 70किमी आहे.. वळणा वळणा च्या वाटेवर हळू हळू काळोख नाहीसा होत होता आणि सह्याद्र...

सह्याद्री मस्तक साल्हेर!!!

Image
                            पूर्वार्ध   ट्रेक सोबती ^संग्राम इंदोरे- Dr फ्रॉम वाघोली ^धुमाळ सर फ्रॉम शिक्रापूर ^मनोज भालेगरे आणि रवींद्र शेडगे(डोंगरयात्रे चे म्होरके)Guest apperence) ^आणि मी रणधुरंधर फ्रॉम United States of Wagholi Emirates बुद्रुक "इतिहास मत पुछो"              Dr आणि धुमाळ सर दोघे घोरत झोपले होते,ह्यात मला काय झोप शिवणार.इतक्या लांब रात्र भर गाडी चालवत आल्यावर हे असच होणार होत,गाडी मधून किल्ल्या कडे जाण्याची वाट विचारण्या करता उतरलो...सकाळ चे  सहा वाजले होते,पण वाघामबे गावात कुणी दिसेनासे झाले,फक्त कोंबड्यांची आरोळी एकु येत होती.आणि जी मला थंडी ने घेरले ,गप गाडी मध्ये येऊन  बसलो,त्यात डॉक्टरांना जाग आली, म्हणाले आपण साल्हेरवाडीतुन जाऊ,म्हंटल ओके,साल्हेरवाडीत पोहचलो, तिथं राजगड हॉटेल आहे,गाडी पार्क करून नाश्ता करून घेतला,बरेच भटकी लोक येऊन पोहचले होते,मुंबई,नाशिक,पुणे ... मनोज दादा,आणि रवी सुद्धा त्यांचा डोंगरयात्रा ग्रुप घेऊन आले होते...